Wednesday 9 March 2016

माध्यमांचा कृष्णकाळ

गेल्या काही वर्षांत राजकारणी आणि प्रसारमाध्यमांमध्ये झालेला ठळक बदल जाणवतोय. बहुतांश राजकारणी मंडळी मतांसाठी का होईना, जाती-धर्मातील द्वेष फार वाढणार नाही. याची वैयक्तिक पातळीवर काळजी घेत आहेत. आपल्या वॉर्डातील, मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांची कामे फारसा भेदभाव न ठेवता करत आहेत. दुसरीकडे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मात्र जातीय द्वेष कसा वाढेल. प्रत्येक घटनेला जातीचा धर्माचा ‘टच’ कसा देता येईल, यात रममाण झाल्याचे दिसते. परस्परांवर जाती-धर्माच्या आडून हल्ले चढवण्यात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीच आघाडीवर आहेत. देश, समाज जोडण्याची जबाबदारी आम्ही पाळत आहोत, असा बुरखा पांघरून हे सर्व सुरू आहे. स्वातंत्ऱ्यपूर्व काळात वकिलांचा सुवर्णकाळ होता. नंतर तो डॉक्टर, इंजिनिअर्सनी अनुभवला. मधल्या काळात आयटी क्षेत्रातील लोक सुबत्तेचा, यशाचा अनुभव घेत होते.
सध्या प्रसारमाध्यमांचा सुवर्णकाळ सुरू आहे. माध्यमांचे प्रतिनिधी जे म्हणतील तेच खरे असे मानणारा वर्ग मोठा आहे. पण सुवर्णकाळ कधी ना कधी संपणारच. एकतर माध्यमक्षेत्राचे महत्व संपेल किंवा माध्यमांना देश, समाज जोडण्याची खरी भूमिका अंत:करणापासून बजवावी लागेल. अन्यथा माध्यमांचा कृष्णकाळ दार ठोठावत आहे.

No comments:

Post a Comment